जालना : हर समस्या का समाधान है प्रभू महावीर के पास है । तीर्थंकर को कोई भी गुरु नही होता. हम सब अव्यवहार राशीतून आलो आहोत. परंतू आमच्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत, म्हणून आपण व्यवहार राशीत आलो आहोत, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात म्हणजेच 62 दिवस पुच्छीसुमन तप महोत्सवात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, प्रभू महावीर का हम क्या गुणगाण गाये। उनका जितना भी गुणगाण करेंगें उतनाही कम है। आपण खरे तर त्यांचे उपकार मानायला पाहिजेत. की, त्यांच्यामुळेच आपण इथ पर्यंत तरी आलो आहोत. हम जैन होते भी अपने में प्रभू महावीर कहॉ है। करुणा के पात्र है क्या हम। प्रभू महावीर को कभी भी अपनेसें अलग मत समझों। वो सदा अपने पास रहथे है। असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.