जालना : तपोधाममध्ये आजपासून श्रृतआराधना सुरु झाली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनीअभिमान आणि स्वाभिमान यातला फरक समाजवून सांगितला. ते म्हणाले की, कुत्ते भोकते है वो अभिमान आणि हात्ती चालतो तो आहे स्वाभीमान, आपण काय निवडणार? असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, अभिमान हा कुत्र्यांसारखा असतो. घोषणा करणे म्हणजे अभिमान आणि हत्ती चालतो तो आहे स्वाभिमान! कुत्र्यांने कीती भुंकू द्या हत्ती आपला चालत- चालत राहतो. तुम्हाला या पैकी काय पसंत आहे? असे सांगून ते म्हणाले की, चातुर्मास कशासाठी आहे. तर तो आपल्यात आत्मशुध्दी यावी म्हणून! नमन करावी, अशी ही भूमी आहे. महावीर को जुडने का क्या काम हैे। महावीरांमध्ये ती ताकद आहे. जी कशातही नाही. वह भी मै हूॅ! ये भाव अपने अंदर कब आता है। असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.