जालना : मोहनिय कर्मातून बाहेर कसे पडावे. आपलं भाग्य आहे की, आपल्याला या दरबारात प्रभू महावीरांची गाथा आपल्याला श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आपण या गुरुंच्या दरबारात आहोत, अंगणात आहोत. या अंगणाची शोभा कधी वाढेल? आपण जेव्हा प्रभूंचे नाम घ्याल, त्यांचे गुणगाण गाल तेव्हाच तेही आपल्या पावन होतील, तेही आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करतील. आपल्याला ही संधी मिळाली आहे, असे समजा आणि या संधींचे सोनं करा, असे सांगून ते म्हणाले की, एक शेतकरी आपल्याला शेतात विहिर खोदतो.
त्याला शंभर फुटावर पाणीही लागले. परंतू हे अविवेक आपल्याला कर्तव्यहिन बनवतो. हे कोणाच्याही कसं लक्षात आलं नाही. सुधर्मा स्वामी 9 व्या गाथ्यात आपल्याला काय सांगतात, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपले भले होणारच आहे. पण त्याकडे लक्ष कोण देतो, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.