जालना : योगी बनू शकत नाही पण सहयोगी तर बना. असा हितोपदेश देतांनाच ते म्हणाले की, आपलं घर आहे ना, ते सुमेधापरवत असलं तरी प्रभू महावीरांना कधीच विसरु नका, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, प्रभू महावीरांप्रमाणे आनंद दायी जीवन जगायला शिका. भगवान मेरे है, असं प्रत्येकाला वाटायला हवे. आयना तो साफ किया तो मै नजर आया, जब मैने खुद्द को साफ किया तो तू नजर आयां! सांगायचं तात्पर्य हे जोपर्यंत मै हा जाणार नाही. तोपर्यंत आपण तरी कसे सुधरु, तुही मेरा सबकुछ है । योगी (अरिहंत), उपयोगी और सहयोगी! योगी कसा असला पाहिजे. आपल्या तर मनात एक, ओठावर दुसरेच आणि शरीत राहते ते तिसरेच! जे ध्यान म्हणजे धरम धान्य! याने की, आत्मा! तो योगी याने अरिहंत! अरिहंत नही तो उपयोगी तर बने, छोटे योगी, मैत्री भाव हाच प्रभाव आहे. नही तो सहयोगी! संत कब बन पावोगे । पहिले हम अरिहंत तो बने! खुदा से हमारा कब प्यार होगा!
तूही हमारा स्वरुप है । ंयावेळी त्यांनी खाईची गोष्टही सांगितली.याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.