श्रीरामपूर दि. 31 (वार्ताहर) : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी महाराज हे श्रमण संघाचे महान आचार्य होते त्यांनी श्रमण संघाची ध्वजा सर्वत्र फडकविली असे विचार श्रीरामपूरच्या जैन स्थानकमधील चातुर्मास प्रवचनातुन उपदेश देतांना प्रज्ञाज्योती पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी आचार्य आनंदऋषिजी महाराज यांच्या जयंत निमित्त व्यक्त केले. आनंदऋषिजीची जीवनगाथा सर्वाना प्रेरक आहे. तेराव्या वर्षी पू. रत्नऋषिजी महाराज यांच्या मुखरविंदाने दिक्षा ग्रहण केली. मातेच्या संस्कारामुळे त्यांना धर्माची ओढ लागली. कठीण परिस्थीतीत शास्त्रांच्या अभ्यास केला. त्यांच्या कर्यकर्तृत्वामुळे आचार्य ही पदवी मिळाली. संपुर्ण भारतात ज्यांची जयंती साजरी केली जाणारे आनंदऋषिजी महाराज हे जैन धर्मातील एकमेव आहेत.
आनंदऋषिजी म्हणजे प्रेम व ज्ञानाच्या संगम होय त्यांनी सर्वांनी समान वागणुक दिली. भगवान महावीरांचा संदेश भारतभर पसरविण्यांत त्यांचा सिहांचा वाटा आहे. जीवनात गुरुला महत्वाचे स्थान आहे, त्यांची वचने आमलात आणावीत, चातुर्मास हा आराधना करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुचा आशिर्वाद कृपा ही जीवनाला आधार देते. ज्यांना गुरुची कृपा मिळते तो भाग्यवंत असतो, निर्मल, निष्कलंक लोण्यासारखे मन भावनात भव्यता, दु:खीत बद्दल संवेदनशिलता हे त्यांचे वैशिष्ट होते. आचार्य आनंदऋषिजी महाराजांनी विविध भाषांचा आभ्यास केला, त्यांना अनेक भाषा ज्ञात होत्या. हातावरील रेषा भाग्य ठरवत नाहीत तर त्याकरीता महापुरुषांचा आशिर्वाद व कृपाच लागते, त्यांच्या सानिध्य भाग्याने लाभते.
मानवी जिवनाला आनंद देणारे आनंदऋषिजी हे महान होते, त्यांचे जीवन स्वच्छ व निर्मल होते. धर्मच त्याच्या जीवनात होता. परमेश्वर देखील महापुरुषांना वंदन करतात, त्यांच्या कृपेची अनुभुती मिळते असे विश्वदर्शनाजी प्रवचनातुन म्हणाल्या. प. पू. तिलकदर्शनाजी महाराज प्रवचनातुन म्हणाल्या की, धर्माची उपसाना, मन, बुध्दी, शरीराला शुध्द करते, धर्माविषयी श्रध्दा भाव निर्माण होतो. संतापासुन शिकण्यासारखे आहे त्याचा लाभ करुन घ्यावा. आचार्य आनंदऋषिजी महाराजाचा जन्म गुगळे परिवारात चिचोंडी शिराळ ता. पाथर्डी येथे झाला होता. जन्म सोहळ्याचा जीवन देखावा आनंद जैन पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी आदर्श जैन बहु मंडळ व महिला मंडख यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. चिचोंडी गावातील पहाटेचे वातावरण व गावचे दृश्य सादर केले. पाळण्यामध्ये आनंदऋषिजीच्या जन्माच्या डॉ. पियुषा बाठिंया यांचे चिरजींव तनुष या 8 महिन्याच्या बालकाचा सहभाग होता. या नाटीकेचे वर्णन प.पू. तिलकदर्शनाजी महाराज यांनी केले. सुत्र संचालन दिपक संघवी यांनी केले. नाटिकेच्या कलाकारांना यावेळी रोख स्वरुपात अनेकांनी बक्षिसे मिळाली. नाटीकेच्या यशस्वीतेसाठी प्रविण चंगेडीया व कु. स्मीता संघवी यांनी विशेष परिश्रम घेतले.